अहमदनगर- पुणे दरम्यान दररोजच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो. रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय होतो.