जाहीर केल्याप्रमाणे (मनासारखे निकाल लागले तर मी नागीन डान्स करेल असे जाहीर केले होते) मतदारांनी देशावरचे संकट टाळल्या बद्दल, काँग्रेस महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनल्याबद्दल आमचा 'नागिन डान्स' 😊😊
गेले २५/३० दिवस दवाखाना बंद ठेऊन तालुक्यात मित्रपक्षाचे उमेदवार श्री करण पाटील यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला, काल मतदानाच्या ठिकाणी दिवसभर थांबलो आणि आज रूग्णसेवेत रुजू झालो. बरेच शिकायला मिळाले, मित्रपक्षाचा उमेदवार असल्याने त्यांच्या नियोजनानुसार पण भरपूर काम केले
जय काँग्रेस
सांगलीची जागा आपल्याला मिळाली नाही याचे नक्कीच वैषम्य आहे पण 'जिंदगी बडी लंबी होती है' हे लक्षात ठेऊन कटूता न वाढवता एकजूटीने लढून महाराष्ट्रातून इंडिया आघाडीच्या जास्तीतजास्त जागा निवडून आणणे हे काॅंग्रेस कार्यकर्ता म्हणून मला आपले कर्तव्य वाटते !
काँग्रेस पक्षाचा विजय असो ❤️
क्रोनोलॉजी समजून घ्या आणि कपाळ झोडत बसा 🤣
* २०२२ ला म्हणजे गेल्याच वर्षी विश्वगुरूंनी घोषित केले की भारत संपूर्ण जगाची भूक भागवू शकतो ( विश्वगुरूंना अशी अवास्तव 'लंबी लंबी फेकने की आदत है' )
* व्यापाऱ्यांनी पळत्या फळाची आज्ञा समजून भारतातून भरमसाठ गहू निर्यात केला,(पुढे पहा)
आत्ता भारत जोडो न्याय यात्रेत चांदवड येथे राहुल गांधी, शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या शेतकरी मेळाव्यात नेत्यांच्या भाषणाआधी शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यात आले. हे शेतकरी २०१४ नंतर शेतकऱ्यांना जे पिडण्यात आले त्याबद्दल तळमळून बोलत होते.
@sachin_inc
तुमचा अभ्यास आणि तुमची सजगता, वेळ न दवडता अचूकपणे वक्तव्य जारी करण्याची तुमची हातोटी आमच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे सचिन सर !
अनिल अंबानीची राफेल विमानांची भागीदार कंपनी दिवाळखोर जाहीर :-
यासाठी मी काॅंग्रेस कार्यकर्ता सर्वात प्रथम मोदी सरकारचे अभिनंदन करतो. ऐंशी ब्यांएशी वर्षाचा विमान निर्मितीचा अनुभव असलेल्या हिंदुस्थान एयरोनाॅटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीला ठरलेल्या करारातून बाहेर १/१
Gaurav Pandhi यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी केलेल्या इंग्रजी ट्विटचा भावानुवाद :-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेली आणि पाच महिने ही यात्रा चालली. एवढ्या प्रदीर्घ अंतरापर्यंत व पाच (पुढे पहा)
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा कशासाठी काढली याचे उत्तर शंका सुरांना पाहिजे असल्यास खालील पोस्ट वाचा.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा जवळपास चार हजार किलोमीटरच्या या पदयात्रेत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लाखो लोक भेटले. राहुल गांधींनी त्यांच्या(पुढे पहा
आज सकाळी सायकलिंगला गेलो असता व्यायाम करतांना रस्त्यावर भेटलेल्या युवकांशी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील युवा न्याय संबंधी बोललो. तीस लाख पदे भरणार, अग्नीवीर रद्द करून नियमित भरती करणार, प्रत्येक पदवीधराला अप्रेंटीसशीप देणार, पेपर लिक बंद करणार आदी माहिती दिली ☺️
गुजरात मधील एका डॉक्टरने भाजपच्या खासदाराला 3.25 कोटी रुपये उसनवार दिले होते,अनेकदा मागूनही तो खासदार पैसे परत करत नव्हता उलट डॉक्टरला व त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत होता म्हणून डॉक्टरांनी आत्महत्या केली. या खासदाराविरुद्ध फक्त FIR दाखल करायला 90 दिवस लागले
NEW INDIA
दोंडाईचा शहरात क्रांतीचौकापर्यंत राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रोड शो करत जाणार आहे त्यासाठी कॅम्प बाहेर प्रतिक्षा करत उभे असलेले आम्ही ☺️
#MaharashtraWithRahul
भारत जोडो न्याय यात्रा आज सकाळी दोंडाईचाहून धुळ्याकडे निघाली असतांना वाटेत चिमठाण्याजवळ असलेल्या क्रांती स्मारकावर आम्ही थांबलो होतो. राहुलजी नुकतेच या स्मारकाला अभिवादन करून पुढे धुळ्याकडे गेलेत.
❤️☺️☺️
कर्नाटक मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाल्याबद्दल अजय व सुष्मिता या जोडप्याने आज मला राहुल गांधींचा फोटो असलेली ही फ्रेम भेट केली आणि आम्ही मिळून कर्नाटकचा विजय साजरा केला 😊❤️✋✌️👍
मी OBC वर्गापैकी आहे. माझ्या वडिलांनी काँग्रेस निवडली म्हणून आम्ही पूर्वी जे दारिद्र्यात खितपत पडलो होतो त्यात शिक्षण, आरोग्य, शेती यात सुधारणा होऊन आज सुस्थितीत आहे. मी काँग्रेस कार्यकर्ता आहे पण आज दुर्दैवाने माझ्या अनेक समवयस्क मित्रांना हिंदुत्वाची मोहिनी पडली (पुढे पहा)🙏
मी भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून १२ मार्चपासून आज १५ मार्चपर्यंत चार दिवस भरपूर काम करून, भरपूर एनर्जी घेऊन घरी परत निघालो आहे. राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेतून लाखो मने चेतवली आहेत हे मी या चार दिवसात अनुभवले आहे !
जय काँग्रेस 😊❤️👍
माझा भारत जोडो यात्रेत पासूनचा मित्र अजय पाटील आणि त्याची बायको युवक काँग्रेसची पदाधिकारी सुश्मिता दोघेही जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी फिरत आहेत, लोकांना बोलते करत आहेत. या व्हिडिओत हा तरुण म्हणतो ही निवडणूक सत्ताधारी विरूद्ध जनता अशी आहे !
एकच वादा करणं दादा 😊
माझे मत शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी, स्वस्ताईसाठी, अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत त्या मायबापांसाठी म्हणजेच काॅंग्रेसच्या पाच न्यायासाठी 👍
@Karan_patil_ubt
हिमाचल प्रदेशचे सफरचंद उत्पादक शेतकरी अमेरिकेतून आयात होणाऱ्या सफरचंदांवर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याची केंद्र सरकारकडे मागणी करत असताना केंद्र सरकारने नुकत्याच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरताच जणू अमेरिकेतून आयात होणाऱ्या (पुढे पहा)
काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांमुळे मी काॅंग्रेस कार्यकर्ता म्हणून अजिबात विचलित नाही.
आहेत त्यांच्यासह आणि गेले त्यांच्या विना आम्ही काॅंग्रेसच्या विचारसरणीनुसार लढा लढू आणि जिंकू !
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या अहिराणी पट्टामधला शेतकरी मायबापसले एक सामान्य काॅंग्रेस कार्यकर्तान आवाहन. मी जरी कोणी मोठा नेता नसनू तरी शेतकरीस्ना हाल अनी फसवणूक मी देखी राह्यनू म्हनीसन मी मन्हा दवाखाना बुडयीसन प्रचारमा तिख्खिसन लटकेल शे अनी तुम्हलेबी सांगी राह्यनू 🙏🙏
मोहनदास पै नावाच्या कुण्या भक्ताने कर्नाटक निवडणुकीत भाजपला बसलेल्या झटक्यानंतर काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांना उद्देशून ट्विटरवर 'आम्ही कर दाते असून आमचा पैसा फुकट उडवण्यासाठी नाही' अशी मोहीम चालवली आहे.
पण या महाभागाला कुणीतरी सांगितले पाहिजे की करदाते हे बिगर करदात्यांच्या
आज काँग्रेस पक्षातर्फे बूथ लेव्हल एजन्ट नेमण्यासाठी फिरत असतांना एका छोट्या खेड्यात माणसे भेटली. माझी ओळख करून दिल्यानंतर माझ्या उजवीकडे उभे असलेले टोपीवाले बाबा एकदम भावनाविवश झाले व मला सांगू लागले की आम्हीही काँग्रेसवाले आहोत, त्यांनी त्यांच्या मुलाचेच नाव बीएलए म्हणून दिले 😊
जळगाव लोकसभेचे इंडिया आघाडीचे शिवसेना ( उबाठा)चे उमेदवार श्री करण पवार मतदारसंघातील आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. आज ते भेटीसाठी माझ्या पाळधी येथील क्लिनिकमधे आले असता त्यांचे स्वागत केले, सोबत धरणगाव तालुका अल्पसंख्याक सेलचे प्रमुख साजिद पटेल, बाळू पाटील
काँग्रेसच्या मित्रांनो काॅंग्रेसच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेस महासंमेलनास भेटू या, २०२४ ला जुमला सरकार उखडून फेकू या !!!
चलो नागपूर! चलो नागपूर!! चलो नागपूर!!!
👍💪 २८ डिसेंबर
मोदीही काँग्रेसने 75 वर्षात काहीही केले नाही असे म्हणतात व केजरीवालही असेच म्हणतात.
म्हणून मला हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे वाटते.
75 वर्षात काहीच केले नसते केजरीवालांच्या आज 'उचलली जीभ लावली टाळ्याला' प्रमाणे घरेच भरली असती तर स्वातंत्र्य व लोकशाही 75 वर्षे १/१
गाई, म्हशी धडकल्याने वंदे भारत ट्रेन्स क्षतिग्रस्त झाल्याचे अनेकदा वाचण्यात येते.
चारपाच दिवसांपूर्वी १८ जुलैला उद्घाटन झालेल्या अंदमान येथील विमानतळाचे छत कोसळण्याची घटना काल घडली.
नवीनच तयार झालेले महामार्ग वाहून जाण्याच्या, पूल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत(पुढे पहा)
तालुकाध्यक्ष बनून एक वर्ष झाले. या एका वर्षात पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने व खास मोहीमा आखून तालुक्यात एकही गाव असे सुटले नाही की जिथे पोहोचलो नाही. बऱ्याच गावांना तर अनेकदा जाणे झाले, याचे समाधान आहे.
😊
@INCMaharashtra
@NANA_PATOLE
@bb_thorat
मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पक्षाचे काम कर असे कुणी सांगेल याची प्रतीक्षा करण्याची मला गरज नाही, मी माझ्या कौतुकासाठी हपापलेपण करणार नाही.पक्षाचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी त्याच्यात्याच्या परीने झटत आहे याची मला जाणीव आहे. मी रडत आणि तक्रारी करत बसणार नाही !!
व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे पंडित व्हाट्सअपवर काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल अपप्रचार करत आहेत त्यांच्या अपप्रचाराला खोडून काढण्यासाठी त्याच व्हाट्सअप गृपवर आज केलेली पोस्ट 👇
समाज बांधवांनो काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असे कुठलेही मुद्दे नसून अपप्रचाराला बळी पडू नका (पुढे पहा)
काँग्रेसचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे द्या असे गिरीश महाजन यांना माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांचे जाहीर आव्हान,काँग्रेसला समर्थन वाढत असल्याने खोट्या वावड्या उठवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले
Proud of you
@AshokChavanINC
@ChitraKWagh
@NANA_PATOLE
@INCIndia
@MumbaiPMC
@INCMumbai
चारित्र्यहनन करण्यासाठी फक्त टीशर्ट पुरेसे होत असेल तर नेते घालतात तसेच शर्ट, साड्या, ड्रेस घालून व पाठमोरे व्हीडिओ, फोटो काढून कुणाचेही चारित्र्यहनन करता येईल.
काय हीन पातळीच्या राजकारणावर उतरलेत हे लोक ? बदनामी करण्यात यांनी मनुकडूनच उच्चतम पदवी मिळवली आहे.
@kunalkamra88
Modi's conversation with student's about how to give exam, is national shame !
A man who himself lying about his educational qualification, gives lecture to student's is shameful .
महिन्यापर्यंत चाललेल्या या यात्रेत एक सुद्धा जातीय हिंसाचाराची घटना कुठेही घडली नाही याउलट सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.
या उलट भाजप आणि आरएसएसशी संबंधित संघटना जेव्हा केव्हा अशा यात्रा काढतात किंवा आताही काढत आहेत (पुढे पहा)
मी कालपासून विचार करत आहे, फडणवीस यांनी काल उंटासहीत अेाेरंगाबादेत पाण्यासाठी काढलेला मोर्चा खरा की फडणवीस यांनीच अब्जावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र पाणीदार करून टाकल्याच्या जाहिराती खर्या ?
दोन्ही गोष्टी एकाचवेळी खर्या तर असू शकणार नाहीत !
कुणी उत्तर देईल का मला उत्तर 🤔🤔
माझ्या काॅंग्रेस पक्षाने जाहीरनाम्यासाठी जनतेच्या सुचना मागविल्या होत्या. मी २४ जानेवारी रोजी पक्षाने दिलेल्या पत्त्यावर ईमेल पाठवून शेतकऱ्यांवरील जीएसटी रद्द करण्यात यावी ही मागणी केली होती आणि मला आनंद होत आहे की काॅंग्रेसने शेतकऱ्यांवरील जीएसटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.
तेव्हा या यात्रा त्यांच्या मागे हिंदू ,मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे मृतदेह, जळालेली घरे, जळालेली दुकाने आणि रक्ताने माखलेले रस्ते याचे माग सोडत जातात.
या यात्रा या दोन्ही पक्षांची उद्दिष्टे व विचारसरणी मधील फरक स्पष्टपणे दाखवून देत आहेत.
आता तुम्हाला आणि तुमच्या (पुढे पहा)
काल संध्याकाळी भिवंडीला भारत जोडो न्याय यात्रेत राहुलजींची सभा संपल्यानंतर मी जळगावला परत यायला निघण्यापूर्वी अजय,सुष्मिता,सलमान,नांदेडचा तुळशीदास व तेलंगणाचा बाळू मिळून प्रतिज्ञा घेतली.यावेळी मोठी गंमत झाली मी हम सब म्हटलो की सगळे एक है म्हणायचे, हसून हसून पोट दुखायला लागले होते
गुजरातमधून मागील पाच वर्षात चाळीस हजार महिला बेपत्ता 🥺😡
नाही ही 'केरल स्टोरी' सारखी भाकडकथा नाही तर आजच्या इंडियन एक्स्प्रेस मधे एनसीआरबी च्या हवाल्याने छापून आलेली बातमी आहे !
गुजरात स्टोरी कधी बनवता रे ?
काँग्रेस नेते श्री जयराम रमेश यांच्या महत्त्वाच्या इंग्रजी ट्विटचा मी केलेला भावानुवाद :-
रोजच्या सरकारी कामकाजाला व्यक्ति केंद्रित करून मोदींनी सरकारी कारभाराचे कधी नव्हे एवढे नुकसान करून ठेवले आहे. त्यांच्या तथाकथित रोजगार मेळ्यांनी मोदींनी याबाबत खालची पातळी (पुढे पहा)
मोदीजी निवडणुका आल्या तेव्हाच कशी तुम्हाला राज्याची आठवण येते? कुठे होते तुम्ही महाराष्ट्र कोरोनाने होरपळत होते तेव्हा? कुठे होते तुम्ही राज्यावर पूर आणि अतिवृष्टीचे संकट कोसळले तेव्हा ?
#महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा
आज भारत जोडो न्याय यात्रा दोंडाईचा येथून प्रारंभ झाली. सकाळी राहुल गांधी व भारत यात्री तयार होऊन कॅम्पच्या बाहेर येण्याची प्रतिक्षा करत बरेच लोक बाहेर उभे होते. त्यांच्याजवळ मी माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या. व्हिडिओ यापेक्षा मोठा आहे पण पूर्ण व्हिडिओ येथे पोस्ट होत नाही.
जेष्ठ पत्रकार
@ashish_jadhao
यांनी काल माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत टोल फ्री ईस्टर्न फ्री वे बनवला त्यामुळे पावसामुळे वाहतूक खोळंबली असे होत नसल्याचे ट्विट केले.मी काॅंग्रेस कार्यकर्ता असूनही मला हे माहीत नव्हते किंवा विसरलो होतो हे कबूल करतो
@prithvrj
🙏
आहे, नव्या हंगामातील गहू यायला अवकाश आहे. त्यामुळे जे विश्वगुरू एका वर्षापूर्वी आम्ही जगाची भूक भागवू शकतो अशा बढाया मारत होते त्या विश्वगुरूंच्या सरकारला आता गहू आयात करण्याची वेळ आली आहे
बसा कपाळ झोडत
अविचारी नेतृत्व देशाला संकटात कसे टाकू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे
आम्ही महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमच्या मतदारसंघातील मविआचे शिवसेना उबाठाचे उमेदवार श्री करण पाटील यांच्या प्रचारासाठी आज धरणगाव शहरात रॅली काढली होती ❤️
आज काॅंग्रेस सोडून जाणाऱ्यांना एक दिवस पश्चात्ताप आल्याशिवाय राहणार नाही आणि तो दिवस फार दूर नसेल.
आणि हो त्यांना हा पश्चात्ताप पक्षासाठी, जनतेसाठी येणार नसून त्यांच्याच राजकीय अस्तित्वासाठी म्हणजे व्यक्तिगत स्वार्थासाठीच येणार आहे.
हा काँग्रेस कार्यकर्त्याचा शब्द आहे !!!
चार जूनला मनासारखे निकाल लागले तर तालुक्यातील जुन्या जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना पेढे खाऊ घालणार आहे !!!
चार जूनचे नियोजन 😃😃
@sachin_inc
तुम्ही मविआ सरकारवर होणार्या प्रत्येक आरोपावर सविस्तर, खुलासेवार आणि बिनतोड उत्तर देतात त्यामुळे आम्हाला सत्य कळण्यास मदत होते आणि सोशल मिडीयावर प्रतिवाद करता येतो
याबद्दल काँग्रेस कार्यकर्ता म्हणून व महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीयाचा प्रदेश सचिव म्हणून तुमचे खूपखूप आभार 🙏🙏
आत्ता नंदुरबारच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या राहुल गांधींच्या सभेत आहे. कडक उन्हात सी व्ही पंपजवळच्या पटांगणावर होत असलेल्या या सभेत पूर्ण पटांगण माणसांनी खचाखच भरले आहे !
#MaharashtraWithRahul
नॅशनल हायवेवर २०१४ ला चोवीस हजार कोटी रुपये कर्ज होते. मनमोहनसिंग सरकारने त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठमोठे रस्तेविकासाचे प्रकल्प पार पाडूनही ही स्थिती होती आणि पेट्रोल, डिझेलवर रस्तेविकास कर होता केवळ एक रुपया.
मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या काळात रस्तेबांधणीच्या मोजणीच्या१/१
महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे उमेदवार श्री करण पाटील यांच्या प्रचारासाठी आज आमच्या धरणगाव तालुक्यात माजी पालकमंत्री श्री गुलाबराव देवकर, उमेदवार श्री करण पाटील, श्री गुलाबराव वाघ यांचे सोबत.
आत्ता��� एक भयावह आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार सरकारने 2014 नंतर सरकारी मालकीच्या उद्योगांमधून 3 लाख 84 हजार नोकऱ्या नष्ट करून ठेक्यांवरच्या नोकऱ्यांचे प्रमाण 19% वरून तब्बल 42% एवढे वाढवत नेलेले आहे, तरुणांनो डोळे उघडा !
आज सकाळी श्री करण पाटील यांच्या प्रचारासाठी जांभोरा येथे गेलो असता हा जन्मतः मुका मित्र भेटला.आमच्या जवळील प्रचार पत्रकावर सोनियाजी, राहुलजींचा फोटो पाहून त्याला आनंद झाला व तो इकडे तिकडे पाहू लागला, त्याला माझ्या गळ्यातील पंज्याचे मफलर दिसल्यावर तो मला आनंदाने भेटायला आला 😊
काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यात सुरू असलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या पाहणी दौऱ्यातील काही फोटो. सकाळी लोक कामाला जात असल्याने दुपारी तीन वाजेनंतर आठवड्यात चार दिवस आम्ही तालुक्यात फिरत आहोत, काल चार गावे फिरलो. जय काँग्रेस 😊
@Manva_tweets
@PChidambaram_IN
IND saw record break unemployment
IND saw record break lowest gdp
IND saw record break rise in debt
IND saw first time in history of India that Bangladeshi's pre capita income is more than Indian.
Yet if you decided for Modi no one can save you, happy journey of perishing.
कट रचून धावती गाडी अंगावर चढवून शेतकर्यांची दिवसाढवळ्या हत्या करणार्या अपराध्याचा वडील मोदींसोबत मंत्रीमंडळात गृहमंत्रीपदी कायम आहे त्याचे मोदींना, भाजपला आणि गोदी मिडीयाला काहीच वैषम्य वाटत नाही.
पण बारा कोटीच्या बाँबस्फोटानेही नुकसान न होणार्या व एसपीजी सुरक्षाकवचात १/१
गव्हाचा तुटपुंजा बफर स्टाक आहे.
* भारत जगातील तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश असला तरी भारताची देशांतर्गत गव्हाची मागणीच भरमसाठ आहे.
* २०२३ फक्त एका वर्षातच आपल्या सरकारची दाणादाण उडाली आहे. गव्हाचे भाव बाजारात वाढले आहेत, उत्पादन कमी होण्याची शक्यता(पुढे पहा)
जगातील सगळे देश येणाऱ्या काळातील धोका ओळखून त्यांच्या त्यांच्या देशात अन्नधान्याचा साठा करण्याची दक्षता घेत असताना आपले सरकार बिनडोकपणे गव्हाची कोठारे खाली करत होता.
* वातावरण बदलामुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले आणि निर्यातीमुळे सरकारी कोठारे खाली झाली, सरकारजवळ आता (पुढे पहा)