बहीण मोठी होताना पाहिलं...
तशी ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी फक्त.खुप दिवस सोबतीला काढले,भांडलो,हसलो,मस्करी,चेष्टा अगदी बालपणापासून. सगळ्यात आळशी समजली जाते ती आमच्या घरात.म्हणजे हलकस टेकन भेटलं तरी ती झोपु शकते.कुठल्या ही uncomfortable जागेत ती झोपणार.👇
शेवटची भेट..अजरामर कलाकृतीसारखी मनात तशीच राहिली.मिठीतला सुगंध आजही आहे सोबती..हरवलं फक्त नात..उन्हाने सावलीची आस सोडली जगणं आडवं आलं कदाचित.
परिसाच्या स्पर्शाने सोन व्हायचं होत पण साल पारिस स्पर्शाची आस राहिली अन दगड आला नशिबी...
#इंस्टा
#DARK
🖤
एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्ती शिवाय जगणं पण स्वीकारतो... अस नाही की त्याच प्रेम संपत...
पण समोरच्याला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसलीना तर त्याच्यापासून दूर राहणचं योग्य असतं.....
तो अडकून पडलेला श्वास मोकळा करावा लागतो,स्पर्शातला सुगंध मोकळ्या हवेशी एकरूप करावा लागतो.
आयुष्य नावाचा प्रवासात एक असा टप्पा येतो की माणुस एका ठराविक वयात आल्यानंतर घरच्यांपासून दुर होतो.सोबत एका छताखाली रहात असला तरी हल्ली ते बोलणं, हसणं, सोबती खान सगळं सगळं विसरून जातो किंवा सुटत त्याच्या हातून.ते रक्ताचा बंध feel होणं बंद होत..
👇
मन हल्ली कुठे स्थिर होत नाहीय.कोणा व्यक्तीकडे लागून राहिलेली आस ही नाहीय.पण सतत गोचीड चिकटल्यासारखी मनाला लागलेली सततची निराशा जगणं भेसुर करून जातीय.सततची ताणलेला उत्कंठा कशासाठीची आहे हे समजायला ही मार्ग नाही...काहीतरी चुकतंय ची पाल चुकचुकणार्या क्षणाला मन अजूनच आकर्षित करतय...
आयुष्यात अशी वेळ येऊन जाते की u cant sleep. कितीही प्रयत्न केल तरीही.एका अनामिक हुरहूर लागून राहणं,मन भिरभिरत राहणं,रात्र रात्र डोळे सत्ताड उघडे,काय होतंय समजन बंद होत.ड्रिंक वाढू लागली,स्मोक ही,sleeping pillsने फरक पडणं बंद होतंय.एका भयाण समुद्रात एक छोटीशी होडी आहे अन मी त्यात,
आयुष्यातले आनंदाचे क्षण ,उपेक्षेचे हुंदके,दुःखाचे कटु आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होण ह्यासारख्या शाप नाही.पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळण ह्यासारखी वेदना नाही
आयुष्य नावाच्या प्रवासात एक आपल्या सारखाच एखादा व्यक्ती भेटतो अगदी समांतर आयुष्य जगत असलेला.ज्याच्या आवडी,निवडी,स्वभाव सगळं सारखच.
म्हणजे कायम समोरच्यासाठी उभा अन माझ्यासाठी तो नाही उभा राहिला तर समोर तर नाही बोलणार पण ती गोष्ट स्वतःला खात बसणार.
आपल्याला आपलं माणूस फक्त आपलंच असावं वाटतं. यात काही गैर नाही पण असं वाटणं कालांतराने मरणयातना देऊ शकते. आपला त्या माणसाप्रती असणारा लोभ वाढतो, कुणाला काही होत नाही ह्यात फक्त ज्याला हे सगळं वाटतं त्याची मात्र प्रचंड भावनिक गळचेपी आणि निराशा होत राहते.
आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात, हेच एकटेपण, पोरकेपण, केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. जीवन असंच असतं, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतः घालतो;
भावनाशून्य झालेलं मन.थोडस हळव ते पाषाणा पर्यंतचा त्याचा प्रवास.मायेच्या क्षणांसाठी आयुष्यभर आसुसलेल ते मन.खूप धावल त्या मायेसाठी,त्या प्रेमासाठी पण शेवटी अबोल अपमानाची खैरात नशिबी आली.आता मन विटल सगळ्याला.जगण्याचा हाच विटाळ घेऊन पुढे निघावं लागणारे.
लाचारीच नाव आहे आयुष्य..
जोपर्यंत आपण लाचार होत नाही वाटतच नाही आपण माणुस आहे..देवापुढे ताठ मानेने उभं राहिलं तर तो ही लाचार करतो,आपली लायकी दाखवून देतो..अन देव माफ कधी करतो माहितीये,जेव्हा त्यानेच दिलेल्या या लाचारीचा आपण स्वीकार करतो..मगच तो आपल्यावर खुश होतो..
#DARK
🖤
प्रवास आधीच लिहिला गेलेला असतो
तरीही डोळ्यांत पाणी येतं,
नसतो द्यायचा दोष कुठल्याच होडीला, लाटेला आणि भेटलेल्या वाटेलाही, ओघळणाऱ्या गालांवरील सुकून जाऊ द्यायचे अश्रु पण सुकायचं नसतं आपण....
फक्त मिटायचे डोळे आणि असतं म्हणायचं
आयुष्य आहे, चालायचंच !
-श्रीकांत सिंधु मधुकर ✍️
राग..
मारल्याचे घाव वेळेनुसार निघतात पण शब्दांचे घाव ती जखम तशीच भळभळत राहते.मनातलं क्षणभर काढलेलं ते frustration समोरच्याच्या जिव्हारी,त्याच्या भावनांवर याचा काय परिणाम काय होत असेल याची क्वचितच समोरच्याला कल्पना असते.कदाचित बोलणार्याच्या back of mind मधे याला hrt झालं पाहिजे
परिस्थितीचा चिखल झालाय म्हणून प्रत्येक वेळी त्याचा तिरस्कारच करावा असं ही नसत.त्या चिखलाकडेच कमळ फुलवायच सामर्थ्य असत.अन आयुष्यरूपी सुखाचा कमळ फुलवायच असेल तर थोडाफार चिखल उडाला तर कुठ बिघडत..
#DARK
🖤
एखाद्या गोष्टीच्या मागे धावुन धावुन पाय थकावेत पण मन कधी थकु नये.मन थकलं की हृदयांत जाणिवांचा पाषाण होतो..मग उरते फक्त पायपीट हा प्रवास संपावा या निव्वळ आशेमागे चाललेला निरस असा प्रवास..
#DARK
🖤
दुःख अलीकडे स्वतःलाही सांगत नाही मी.रोजच्याच दुःखाची त्याच साचातली नवी कहाणी.आधीच जखम भरून खपली धरण्याआधीच नवं दुःख तारुण्यात येऊ पाहत...कितीही नाही म्हंटल तरी मनाला प्रत्येक दुःख असं वटवाघोळ्यासारखं चिकटुन राहत...
अस्पष्ट भावनेतला स्पष्टपणा शोधायला तेवढी डोळस नजर असायला हवी..
साठून ठेवलेल्या गोष्टींचा मनात विचका होतो या विचक्याचा विद्रोह होऊन हातून काहीतरी अवचित घडण्याची शक्यता असते..
मन निर्मळ आणि भावनिक व्यक्तींच्या नशिबी अशा गोष्टी पावलोपावली घडतात.
कोण कोणाला जन्मभर पुरलय का..? म्हणून काय साथ देणं सोडावं का..? व्यक्तीच्या असण्याच्या सुगंधात चिरकाळ आठवणी गुंफता येतात.गुंफणारे हाथ एक एक क्षण जगून घेतो,तल्लीन होऊन तो नाजूकशा धाग्यांशी कसरत करत असतो.म्हणून काय सुई च बोचन त्याच्या नशिबी नसत काय..?😊
#DARK
🖤
न कळत वय ते...
जगाच्या रीती माहीत नसतात.प्रेम की sexual attraction यामध्ये जी पुसटशी रेष असते न जे की या वयात कळण तसं अवघडच अशा वयात व्यक्तीची ओढ लागुन राहते.भविष्याचा विचार शिवतही नाही पण वर्तमान मात्र अंधारात दिसतोय.
"कधी कधी एखाद्याची भेट नशिबात असते, पण त्या भेटीची तळमळ मात्र आपल्या हृदयात असते. ज्यांनी कोणालातरी स्वतःपेक्षा जास्त प्रेम दिलंय, त्यांना वाट पाहणं म्हणजे काळजातून वाहणारं धुकं असतं. त्यांची आठवण म्हणजे दर श्वासात येणारी हलकीशी कंपने, आणि
एका वेळेनंतर म्हणा किंवा एका जुजबी वयानंतर म्हणा माणुस शांत होतो.अपेक्षांच्या दावणीला बांधलेली नात्यांची घट्ट कास सोडुन श्वास घेऊ पाहतो..क्षणात रागाचा पारा चढणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर एक हलकस म्हंटल तर निराशावादी हास्य दिसु लागत..हा काळ तसा शेवटाचाच..
मृत्यु...
म्हंटल तर सगळ्यात भयाण आणि म्हंटल तर सगळ्यात सुंदर गोष्ट आहे.जगण्यातल्या सगळ्या जाणीवा सम्पल्या,पावलोपावली येणार अपयश,अपेक्षाभंग.आपल्याच लोकांकडून वाढत्या अपेक्षा त्यातून येणारी उपेक्षा यातून सावरत सावरत माणुस जीवन नावाचा प्रवास सुरु ठेवतो.लाचारी दावणीला बांधलेली.
डोळ्यांनी झालेल्या बलात्काराच काय...?
कधी दोन स्तनाच्या मधून ओसरत येणारी री, शिष्णापर्यंत येतांना हवा असणारा सहवासाचा भास डोळ्यात टिपत, कोणाच्या तरी आठवाने तर कधी नुसत्या आऽऽ ने शमणारी भूक फक्त डोळ्यांनीच शमवली गेली आणि तेव्हा ही तुप्त, न आत्मा झाला न डोळे.
कोणी नसण्याच्या गर्तेत कोणीतरी आहेची अनुभुती ही माणसाला किती सुखावून जाते नाही..कोणाच्या असण्याची जीवाला असलेली शाश्वती,संकट आहेत,दुःख आहे,निराशा आहे,भावनांचा गोंधळ आहे,सगळं सगळं कसं आजूबाजूला डोईजड परिस्थितीचा अंधार आहे अन यातुन थकुन शुन्यात उभं राहिलं की परत
एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत क्षणभराच संभाषण ही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलुन जाणार असत.जी अपेक्षा आपल्या समजल्या लोकांकडून आपण खुपदा केलेली असते.पण त्यांच्या priority च्या गणितात आपला हिशोब कधीच होत नाही.कोरड्या भावनांना ओलावा आणण्यापेक्षा कधीकधी या भावनाच जळून खाक व्हाव्या
काही थांबल्यातली शोकांतिका करत बसायला आता नियती तेवढा श्वास उसना देऊ मागत नाही.आभास तो नित्याचाच स्पर्शाची उणीव जिव्हारी लागु देत नाही.असणं, नसणं ही चालती जिवनरेषा, हा न संपणारा प्रवास.वाटसरू यायचे,क्षणभर विसावायचे पण पाय थांबता कामा नये,हा प्रवास थांबता कामा नये...
#DARK
🖤
एका वेळेनंतर म्हणा किंवा एका जुजबी वयानंतर म्हणा माणुस शांत होतो.अपेक्षांच्या दावणीला बांधलेली नात्यांची घट्ट कास सोडुन श्वास घेऊ पाहतो..क्षणात रागाचा पारा चढणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर एक हलकस म्हंटल तर निराशावादी हास्य दिसु लागत..हा काळ तसा शेवटाचाच..
हल्ली मनातल्या किंकाळीचा आवाज ही मूक होत चाललाय...अश्रु बाहेर येत नाहीयेत.आत,आत खुप आतमध्येच साचुन राहतय सगळं.जगण्यातली घुसमट बोलती होईना.हक्काचं कोणी नसल्याची ते ऐकणारे कान नसल्याची ही उणीव कदाचित...
#DARK
🖤
दुनियेच्या नजरेत एक होऊ न शकणाऱ्या त्या अकल्पित दोन जीवांच्या हुंदक्या मधे शोधलेल्या श्वासांची ही कहाणी.
अगतिक शांतीसाठी माळोमाळ भटकणाऱ्या हे जीव जेव्हा दोघांचा सहवास भेटला तेव्हा स्वतःलाच एकमेकांच्या मधे पाहु लागले.जगणं सारखच, हुरहूर ही तशीच.👇
खुप दिवसांपासून आपण एखाद्या गोष्टीच्या मागे असावं अन उद्या ती गोष्ट होईल या अपेक्षेवर सकाळी लवकर उठून उरलं सुरल सगळं possitivity जमा करून ती गोष्ट होण्यासाठी धडपडाव अन मधेच साली माशी शिंकावी तशी गोष्ट उद्यावर ढकलावी..
कधी कधी स्वतःच्या आयुष्याच्या अंधाराकडे थोडीशी डोळेझाक व्हावी म्हणून माणुस या अभासी दुनियेकडे फार कुतूहलाने पाहतो,म्हंटल तर रमतो.अनोळखी लोकांच्या सुखात हसतो,दुःखात उभा राहतो.स्वतःची ती दुखरी बाजू या क्षणभराच्या जगापासून लपवून ठेवून आभासी रंगमंचावरचा एक क्षुल्लक विदुषक होतो.
गालावर ओघळलेल्या अश्रूंचा जेव्हा आपल्या पाठी आपलीच लोक सोहळे करायला लागली..तेव्हा आपसुक आपल्या लोकांसाठी निघणाऱ्या अश्रूंचा रुबाब काहीसा फिका पडला...
#DARK
🖤
प्रत्येकाची एक गोष्ट असते काहींची सुंदर सुरेख मखमली आठवणीनं सारखी हृदयाच्या नाजूकश्या कोपऱ्यात ती कायम स्वरूपी बंदिस्त असते.आठवणीत आलेलं ते चेहऱ्यावरच गोड हसु त्याचाच एक छोटासा पुरावा असतो..
पण..काहींच्या गोष्टीत मात्र जन्मा आधीच बेचिराख झालेली स्वप्न अवहेलना,उपेक्षा.
ओळखीच्या लोकांमध्ये एक आपलेपणासाठी मन धावत पण सापडतच नाही असं जाणवलं की एका अनोळखी लोकांच्या कळपात आपलेपणा शोधत.ट्विटर माध्यम मला तसच वाटत कधी कधी.सगळे अनोळखी तरीही कोणी त्याची भावना मांडताना जाणवत माझीच आहे.कोणी दुःख लिहितो वाटत माझंच आहे, कोणी मनभरून हसत जाणवत मीच हसतोय,
साधेपणातल्या सौन्दर्यात नटलेला तो देखणा साज आपसुक मनाचा ठोका चुकवून जात होता.काळेभोर केस अन त्याला साजेरी चेहऱ्यावर येणारी बट नाजूकशा हातांनी कानामागे करण्यातली कवायत.कानामध्ये असलेल्या झुमक्यांचा वाऱ्यासोबतचा वेगळा फेर सुरू होता.
झीजला देह रक्ताच्या नात्यांची
हमाली करण्यात,
हरवलं मन या जगाची
हुजरेगिरी करण्यात..
थोडस जगायला बाहेर
पडावं म्हणतो,
पण जीव अडकला हो उंबर्याच्या आत
त्याला बाहेर कसा काढू..?
आता हीच जगण्याची रीत उरी
देहाला मोक्ष हा सरणावरी....
#DARK
🖤
प्रेम...
किती सुंदर गोष्ट आहे न ही..आपण निवडलेल,माझं,माझ्यासाठीच हक्काचं कोणीतरी.सोबतीची चाहुलीपासून सुरुवात झालेलं अन अंतरानेही एकट न पडलेलं अस्तित्व..आवड अस्थिर होण्याच्या वयात आलेल्या त्या स्थिर भावनेला प्रेम च हे, कळायला थोडासा उशीरच झाला..
कधीतरी शांत बसावं असं वाटत. आजूबाजूच्या गोंगाटात एकटं राहावं असं वाटतं. पण मग आठवण होते जबाबदाऱ्यांची ! घरच्या बाहेरच्या सगळ्यांचीच. कितीही स्वतः ला सिध्द करा... अपुर्णतेचा आनंद वेगळाच असतो. काय केलंय आजपर्यंत त्यापेक्षा काय करू शकतो? याचा विचार अवर्णनीय असतो.
मनाची गुंतागुंत सैल करण्यासाठी समोरच्याकडून आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं भेटायलाच हवी हा चंग पहिला थांबवला पाहिजे.जर च लावलाच अन तूच उत्तर द्यावी असं वाटलं की समोरचा त्याच्या मर्जीनुसार अन त्याच्या mood नुसार उत्तर देईल.
काही लोकांसाठी आपण फक्त गरजेच्या वेळी त्यांच्या उपयोगात येणारी वस्तु असतो.त्याच्या गरजेवेळी दोर खेचले जातात अन हा एकपात्री बाहुल्याचा खेळ सुरू होतो.काहीसं मनोरंजन झालं की आपली जागा पुन्हा कपाटात.अस्तित्व निर्जीव भावनांच्या लाचारीच्या ससेहोलपटात निघून जात...
#DARK
🖤
सगळं व्यवस्थित असताना अचानक आलेली ती मनात उदासी feel केलीय कधी? मन भिरभिरत राहत ना ना विचारांचं ते काहुर थांबता थांबत नाहीत.अचानक आलेलं ते दडपण आसमंतात सताड उघड्या डोळ्यांनी जगण्यासाठीचा तो शांततेचा श्वास शोधत राहत.तोंडातून ब्र निघत नाही पण ...
वेळ आल्यावर बघुन घेऊ असं म्हणालो होतो पण वेळ आली तेव्हा जाऊदे, असू दे म्हणत सोडून दिलं..
प्रतिशोधाच्या निमित्ताने तरी स्वतःचा शोध लागला; आपण जसे नाही आहोत तसे आपण काहीही झालो तरी नाही होत.
आपण खरंच सगळ्या गोष्टी मनात ठेवून तसं वागलो तर आपण समोरच्याचीच नवी प्रतिमा बनतो !
आज काही लिहता आलं नाही.काही सुचलंच नाही.मनावर काही शब्द उमटले तर लिहून काढावं म्हंटल तर लेखणी घेतली लेखणी ही उदास होती..लेखणीत अश्रूंची शाई भरली होती लिहिलेला प्रत्येक शब्द पुसट होत होता आणि थोड्या वेळाने सुकून जात होता..काय बिघडलं होत आज तीच काय माहित..विचारलं तर बोलनाही....
कधी कधी जाणिवांनी भरलेलं मन कुठे रीत व्हायला धजावत नाही.जगणं विसरून गेलेला देह तीच ती उन्हाची काहिली झालेली वाळवंटी वाट.मायेचा,प्रेमाचा विटाळ घेऊन फक्त वाट सरण्याची वाट पहात बसलेली ही पाऊल.कधी कधी श्वासांच्या शोधात,सुखाच्या हलक्याशा सरींच्या शोधात असतात..
कुठेतरी मायेचा मऊपणा लागला न आयुष्य नावाच्या जमिनीत माणूस भावनांचा विचार न करता पोखरतो..
त्यात मग समोरच्याच मन पायदळी तुडवल जातंय याचंही भान रहात नाही..
#DARK
🖤
झोप...
प्रसन्न वाटेवरची सुखाची व्याख्या अलीकडे हरवलेल्या झोपेचं असं वर्णन करता येईल नाही..?
तृप्तीची आस ठेवून आयुष्याची न उलगडणारी कोडी मनात तशीच राहतात घर करून..मग डोळे बळजबरी झाकायचे म्हंटल तरी जीव कोडी सोडवत बसतो,कधीच न भेटणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधत बसतो,
वेळ आल्यावर बघुन घेऊ असं म्हणालो होतो पण वेळ आली तेव्हा जाऊदे, असू दे म्हणत सोडून दिलं..
प्रतिशोधाच्या निमित्ताने तरी स्वतःचा शोध लागला; आपण जसे नाही आहोत तसे आपण काहीही झालो तरी नाही होत.
आपण खरंच सगळ्या गोष्टी मनात ठेवून तसं वागलो तर आपण समोरच्याचीच नवी प्रतिमा बनतो !
झोपेतुन अचानक आलेली जाग आज एक प्रश्न विचारून गेली “दुःख काय असत..?"
उत्तर शोधायला काळ जातोय रोजचीच की हो ही माझी सोबती तरीही उत्तराला वेळ का लागतोय?प्रश्नाने अचानक डोळे किलकिले झाले कदाचीत याची दाह त्यांनीचं सोसली वाटत.कडा ओलावताना अश्रु निघून गाली कधी आला त्यालाही समजलं नाही.
शब्द ही न फुटलेल्या अगतिक शांततेला सुखाच्या डोहाच्या काहीश्या शिंतोडयांचा मोह का व्हावा..सुख ही अळवावरच पाणी जस वाऱ्याची झुळूक यावी अन निखळून जावं.तसं काटेरी वाटेवरून चाललेला हा जिवन नावाचा प्रवास.
मायेची सावली भेटली क्षणभर विसावू पहात मन.
"प्रेम हे नऊ पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता, आणि क्षमा. बघ! प्रेम दुर्मिळ असतं, असं तुम्ही म्हणता. त्यामागे हे कारण आहे. त्या फुलाचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो आणि हवाहवासा वाटतो. पण या पाकळ्यांचं काय?
प्रत्येक जखमांनी दिलेल्या अनुभवाने माणुस किती समजदार अन जबाबदार होतो नाही.एक काळानंतर सगळं बोथट होत.मनातल्या आकांताला आता आवाज राहत नाही. मौन ओठी,चेहऱ्यावर हसु अन मनात धगधगता पण तेवढाच शांत दाबून ठेवलेला विचारांचा लाव्हा.
लाचारीच्या काळ्याकुट्ट दगडावर उगळायला घेतलेली स्वप्नवत आस.उन्हाच्या काहिलीत मरमर एका गोष्टीच्या मागे मागे पडून पडून स्वप्नपूर्तीची छोटीशी आशा कशीबशी टिकवू पाहत होत मन.पण साल हे पहावल नाही नियती नावाच्या गोचिडाला.चिकटून रक्त रक्त पिऊन शरीर रुक्ष करण्याचा त्याचा चंग
हृदयापासून निघालेल्या प्रत्येक शब्दाला एक मायारूपी काळजीचा मुलामा आपसुक असतो नाही.काळजी दाखवण्याच्या जगात काही काळजी करणा रे शब्द आपल्या झोळीत पडण्याचं सुख अनुभवणं काही औरच.तू माझा आहेस याला शब्दांची सावलीची गरज भासत नाही.डोळ्यांतून अन स्पर्शातून अलगत ती भावना बोलकी होते.
#DARK
🖤
हो अलीकडे न संवाद थांबलाय तसा.पण हा रात्रीचा काळोख निवडक क्षणांच्या रूपान आठवणींच बाळस धरतो.मंद प्रकाशात चेहरा सुस्पष्ट दिसतो,हळूवार आवाज कानी येतो.दुर अंतरावरच्या पाखराकडे मन लागुन राहत..स्पर्शा मधल्या त्या जाणिवा अन
कधी असं होतं..? उंबऱ्या बाहेरच जग आपलंसं वाटत अन उंबऱ्या आतलं जग परख.
कदाचित उंबऱ्या आतल्या जखमा जास्ती बोचऱ्या ठरतात.कारण वार हे आपलेच आपल्याला होत राहतात..नाही..? 😊
#DARK
🖤
जे तुमच्या शब्दा शब्दाला खळखळून हसतात न एकदा त्यांना मिठी मारून पहा अलगद तुमचा खांदा त्यांच्या अश्रूंनी कधी ओलावेल समजायचं नाही.खोल समुद्र असतो यांच्या मनी सगळ्या दुनियेपासून चोरून ठेवलेली ती विचारांची खोली.कोणाला सहजी पाहू द्यायची नाहीत पण थोडस डोकावलं तर
वर्तमानातली मिणमिणती प्रकाशवाट अनुभवायची असता पोर्णिमेचा लख्ख प्रकाश जगण्याला नवं आयाम देऊ पहात होता..पण काही केल तरी भूतकाळाचा अंधार त्या अनाभित अमावस्येच सावट श्वासांना ग्रहण लावुन जातोय...
#DARK
🖤
खुप सार आहे मनात पण साल सांगता एक ही येत नाही. कोणी तरी ऐकुन घ्यावं माझंही यासाठी तरसायचा जीव अक्षरशः एके काळी. पण हल्ली कोणी ऐकणार ही नकोस वाटत.माझ्या आत्म्याच गुढ माझ्यासोबतच नाहीस व्हावं..
#DARK
🖤
अफाट संवेदनशीलता, प्रचंड संयम, तेवढीच निरागसता, अतिव सहनशीलता सारं काही एका हृदययात सांभाळण सोप्प काम नाही ;
“हे सार काही पेलायला स्त्रीचं काळीज लागत !! "
#वाचलेलं
#DARK
🖤
वेळ निघुन जाण्याआधी प्रत्येक क्षण जगुन घ्या...पण
खरच जगता येतो तो क्षण..?
म्हणजे हा व्यक्ती पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यात असेल की नसेल हा घडीचा खेळ समजता येतो..?
मग अचानक होणारी ती मनाची घालमेल,सगळीकडे दिसणारा तो चेहरा हळूहळू या हवेत विरून जातो..
विचारांच्या जाणिवांत मन काठोकाठ भरत कधीकधी.पण अगदीच मोकळं होत नाही मन.लिहायला ही काही सुचत नाही.मग एकटक लक्ष त्या काठोकाठ भरलेल्या विचारांकडे लागुन राहत.काही थेंब खाली पडलेच शब्दांमधून तर थोडं हलकं होईल म्हणतो..
हे विचारांच वादळ थांबलं की पुन्हा चालेल म्हणतो...😊
#DARK
🖤
सामाजीक संकट
माणूस माणसाला परका झाल्यासारखा वाटतो.
तो आनंद कुणासोबत शेअर करत नाही आणि दुःख कुणाला सांगायला जात नाही..
कारण आनंदात वाटा मागणारे दुःखात कधी पाठीशी नसतात.
आणि दुःखाचा बोभाटा करून सगळ्या जगासमोर तुमच्या जखमा उघडे करणारे ही कमी नसतात.
थरथरत्या पावलांत आकाशाकडे नजर स्थिर करण्याचा प्रयत्न तो.श्वास अडकण्यातल्या या भीतीलाही थोडीशी उसंत ही हवीच..नाहीतर स्वतःच्या स्वाभिमानावर तीच नजर केविलवाण्या रुपात स्थिर होऊ पहाते...
#DARK
🖤
समग्र जगण्याचा सार एका ठराविक व्यक्ती मधे शोधु पहात मन.मनाला खटकणार्या खुप साऱ्या चुका पाठी टाकल्या जातात.त्रासदायक गोष्टींवर आठवणींचा मुलामा देऊन जुन्याच गोष्टीला नाविन्याचा काल्पनिक बुरखा चढवला जातो..काहीशा जिवाच्या शांततेसाठी किती कसरत करतो न माणुस..😊
#DARK
🖤
जे एकमेव नात जे निवडण्याचा हक्क फक्त मला होता..बाकी सगळी नाती जन्मापासूनच चिकटलेली.हवी असलेली कधी नको वाटलेली कधी त्रास देणारी अशी काहीशी. पण मी निवडलेले जे नात होत न खर जर जगलो असेल कधी तर या नात्यात.हक्क न सांगताही हक्क होता,प्रेम आहे,तिखट माया आहे अन कोणीतरी
अंगवळणी पडलेलं दुःख शब्दात मांडन तसं सोपच.पण आनंद..? कधी कधी असं ही होत की आनंद शब्दात मांडण अवघड होतं.कदाचित लेखणीला सततच्या दुःखाच्या काजळीची सवय लागून जाते.मनाच ही असच असेल कदाचित चांगलं नाही घडलं तर हे माझ्याच सोबत का..? अन चांगलं घडलं तर क्षणिक तर नसेल न..?
शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे ‛समाधान’.आयुष्यभर वणवण शोधावं आयुष्याच्या शेवटाला उशाच्या कोपऱ्यावर भेटावं असं काहीसं.रोज रात्रीच्या काळोखात होणारा अश्रूंचा अभिषेक नकळत समाधानावर ही होत राहिला..या उपरतीला मात्र एक काळ लागला.
#DARK
🖤
एक व्यक्तीच्या सुखासाठी तिच्या कणभर हसण्यासाठी जीवाचा आकांत करायचो.सोबतीत तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी जाणीवपूर्वक करायचो.ती सोबत असल्याची अन स्पर्शात उमटणाऱ्या जाणिवांची म्हंटल तर सवय लागून गेलेली..
तिच्या त्या स्वप्नासाठी दोघांनी जीव खर्ची घातला
चाचपडणार अस्तित्व शोधण्यात ही रात्र कायमच सोबती झालीय.कारण दिवसाच्या प्रकाशातला तो नागडा निस्तेज चेहरा तुलाही पाहणं आता नकोस झाल असेल न?
शोधण्यातली ती उर्मी आता हळूहळू सम्पल्याची जाणीव तुला झालीच असेल न ?.नसेल झाली तर वेड्या तू त्या खोट्या आशेवर जगतोयस.
गर्दीतल्या वाटा ही ओसाड वाटतायेत.भर पावसातही जमीन कोरडी बोडकी दिसतेय.तारुण्यावर आयुष्याने केलेल्या ओरखडे रक्त रक्त तडफडवतायेत.
खरच असं खडतय की हा ही एक मनाचा खेळ सुरू आहे..
#DARK
🖤
रात्रीच्या काळोखाला चिरून आठवणी मनात घर करत असतात..एकटा शुन्य भावनेला किनार शोधण्याची असलेली आस अशावेळी प्रकर्षाने जाणवते..कितीही बोललं मला गरज नाही कोणाची,रात्रीचा काळोख त्या आत्मविश्वासाला स्वतःसमोरच नागड करतो प्रत्येक काळोख्या रात्री..